जीवनाचे शिल्पकार गुरू असतात; दयानंद हिरेमठ

0



भिवर्गी,संकेत टाइम्स : भिवर्गी ता.जत‌ येथे वेदमूर्ती श्री.दयानंद हिरेमठ यांचे सानिद्यात गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी परम पूज्य श्री.सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमेची पूजा व  ओम नम शिवाय मंत्र म्हणण्यात आले.





यावेळी वेदमूर्ती श्री.दयानंद हिरेमठ म्हणाले की,आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो,त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो.अशा या गुरूंना सन्मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत कायम आहे.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचरं अशी गुरू परंपरा आहे.






मदगोंड सुसलाद म्हणाले की, भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.



Rate Card





उपसरपंच बसवराज चौगुले म्हणाले की,गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे. गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो – गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः  संदर्भ : सनातन संस्थानिर्मित ग्रंथ ‘ सण,धार्मिक उत्सव व व्रते ‘ गुरु-शिष्यांच्या गोष्टी वाचण्यासाठी येथे टिचकी मारा. अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.

या वेळी पोलिस पाटील श्रीशैल चौगुले, नंदेप्पा चौगुले, प्रकाश चौगुले, गोपल वाघोली, साबू कुंबर, नामदेव रानगट्टी, शिवशंकर गुरव,  यशवंत वाघोली, महासिद्ध जेडिवेडर व महिला उपस्थित होते.यावेळी बाळू गुरव यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. 



भिवर्गी ता.जत येथे गुरू पोर्णिमा साजरी करण्यात आली. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.