कोल्हापुरात खंडपीठ स्थापन होणार; सहा जिल्ह्यांतील ४ लाख खटल्यांना मिळणार गती

0
19


🏛️

कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामुळे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील तब्बल ४ लाख प्रलंबित खटल्यांना गती मिळणार आहे. यामुळे पक्षकारांना वेळ, पैसा आणि प्रवासाचा मोठा खर्च वाचणार असून, न्यायप्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी या जिल्ह्यांतील वकिल व पक्षकारांना प्रत्येक सुनावणीसाठी मुंबईला जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत होता. कोल्हापूरमध्येच खंडपीठ उपलब्ध झाल्याने, १५० ते २५० किमीच्या आतच न्याय मिळणार आहे.

या निर्णयामुळे मुंबईवरील खटल्यांचा ताणही काहीसा कमी होईल, असे अपेक्षित आहे.


🔖 टॅग्स:

#कोल्हापूर_खंडपीठ #उच्च_न्यायालय #प्रलंबित_खटले #न्यायप्रक्रिया #सांगली #सातारा #सोलापूर #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #महाराष्ट्र_बातम्या


Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here