‘देवाभाऊ’चे लातूरमधील शेतकऱ्यांसाठी मोठे आश्वासन | आता असे फोटो,पंचनामे मान्य

0
41

लातूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर दौरा केला. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली की, मोबाईलवर घेतलेले फोटो व ड्रोन पंचनामा आधिकारिक पुराव्यासारखे मान्य केले जातील. त्यांनी सांगितले की, सरकारी नोंदी असणे आवश्यक आहे, पण यंत्रणेने लवचिक राहावे; नियम जास्त अडचणीचे न बनवता, शक्य तितकी मदत केली जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलासा देत सांगितले, “घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे.” त्यांनी म्हटले की, दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाईल. याआधी २२०० कोटी रुपये मदतीसाठी रिलीज केले गेले आहेत. NDRF नियमांमध्ये केंद्र सरकारने बदल केले आहेत आणि पद्धत सुधारली आहे, ज्यामुळे एका गावाच्या नुकसानीसाठी देखील लगेच मदत मिळू शकेल.

पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. फडणवीसांनी विरोधकांवरही टोला लगावला, की त्यांच्या काळात आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत कधीच मिळाली नाही.

मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले की, शेतकऱ्यांसाठी शक्य तितके उपक्रम राबवले जातील आणि दीर्घकालीन उपाययोजनांवरही लक्ष दिले जात आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here