गावठाण विस्ताराला 20 वर्षांपासून ब्रेक गावठाणात समावेश नसल़्याने नागरिकाकडून स्व; खर्चातून विकासकामे : ग्रामपंचायतींकडून प्रस्तावच नाहीत

0
27

गावठाण विस्ताराला 20 वर्षांपासून ब्रेक

गावठाणात समावेश नसल़्याने नागरिकाकडून स्व; खर्चातून विकासकामे : ग्रामपंचायतींकडून प्रस्तावच नाहीत

Image result for गाव

जत,(का.प्रतिनिधी):गावठाणातील जागा संपल्याने लोकांनी गावठाण शेजारील शेत जमिनीत घरे बांधली. अकृषक (एनए) न करताच बांधलेल्या या घरांची केवळ करासाठी ग्रामपंचायत दप्तरी नोंद झाली. ही घरे कायदेशीर गावठाणात यावीत, यासाठी मागील 20 वर्षात गावठाण विस्ताराकडे दुर्लक्ष झाले आहे.
महसूल विभाग गावठाण विस्तारासाठी आग्रही असूनही ग्रामपंचायतींकडून ठराव येत नसल्याचे चित्र आहे. दर दहा वर्षांनी जनगणना झाल्यावर वाढीव लोकसंख्या आणि गाव शेजारील गावठाणा व्यतिरिक्त जागेत झालेली घरे यांचा आढावा घेऊन वाढीव गावठाण योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना महसूल प्रशासनाला वाढीव गावठाण मंजूर करण्याचा प्रस्ताव देणे गरजेचे होते. परंतु गेल्या 20 ते 22 वर्षांपासून याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. सध्या गावठाणातील जागा संपलेल्या आहेत. तसेच गावाशेजारील शासकीय जमिनीही संपुष्टात आल्या आहेत. अशावेळी गावाशेजारील शेतजमिनी विकत घेऊन गावात घरे बांधली जात आहेत. या घरांना सोयीसुविधा देताना काही ठिकाणी अडचणी येतात. पण ग्रामपंचायतींनी गावठाण व्यतिरिक्त होणार्‍या नवीन घरे व बंगल्यांचा सर्व्हे करुन त्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद केली. या नोंदीतून ग्रामपंचायतींना मिळणारा कर स्वरुपातील महसूल वाढला पण या घरांना वीज, पाणी, गटारे व इतर मुलभूत सुविधा देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी तर घर मालकांना एकत्र येऊन पाण्याची पाईपलाईन, विजेचा खांब, गटारे बांधावे लागत आहेत. यातून मुक्तता होऊन ग्रामपंचायतींची सुविधा सर्व घरांना मिळण्यासाठी महसूल विभागाने गावठाण विस्तार योजना सुरू केली होती. पण याकडे सर्वानीच दुर्लक्ष केले. वाढीव गावठाणाचे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याची गरज आहे. आता गावागावातून स्थानिकांनी रेटा लावून हे ठराव मंजूर करुन घेणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे योजना सुरू केली आहे. पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजना असे तिचे नाव आहे. त्यासाठी 50 हजार अनुदान आहे. पण एवढय़ा रकमेत एक गुंठा जमीन मिळू शकत नाही पण ज्या ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध आहेत. तेथे ले-आऊट टाकून गरीब मागास व द्रारिद्रय़रेषेखालील लोकांना जागेचे वाटप करण्याचे काम सुरू आहे.

बहुचर्चित 14 वा वित्त आयोगातूनही विस्तारीत भागाला खर्च नाही

जत तालुक्यातील अनेक मोठ्या गावात 14 वित्त आयोगा व अन्य योजनेचा कोट्यावधीचा निधी खर्ची घातला जातो. मात्र विस्तारीत भागाला गावठाणात समावेश नाही म्हणून दुर्लक्षीत ठेवले जात आहे. परिणामी रहिवाशी स्व:खर्चातून तात्पुर्त्या उपाययोजना करतात. त्यामुळे पुढे काही दिवसानंतर समस्या जैसेथे होत आहेत. त्यामुळे आम्ही माणसे नाही आहोत काय?अशा संप्तत प्रतिक्रिया विस्तारीत भागातील रहिवाशाच्या आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here