बेवणूरमधील शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण | न्याय न मिळाल्यास २ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण करू ; श्रेयस नाईक
जत,संकेत टाइम्स : रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे.रस्त्याला आवश्यक असणाऱ्या मुरूम,दगड यासाठी जत तालुक्यातील बेवणूर गावच्या पश्विमेला डी.बी.एल.या कंपनीने मोठी खोलवर खुदाई केली आहे.ब्लोअर ब्लास्टच्या वापराने खुदाई करताना परिसरातील घरांना भेगा व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.याची नुकसान भरपाई मिळावी व कंपनीवर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली.
मात्र काहीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या निषेधार्थ जत तालुका संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षनिक उपोषण करण्यात आले.
