जत : शेतीकामासाठी वापरण्यात येणार्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे ‘पासिंग’ शासनाने 1997 पासून बंद केले आहे. त्यामुळे ट्रॉलीनिर्मिती केल्यानंतर फक्त एकदाच ‘पासिंग’ करण्यात येत असल्यामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ‘अनफिट’ ट्रॉलीद्वारे बेसुमार वजनाची ऊस वाहतूक केली जात असल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. ऊस ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाड्यांना ‘रिफ्लेक्टर’ नसल्याने जिल्ह्यात वाहने धडकून अपघात होण्यास गळीत हंगाम सुरू होताच सुरूवात झाली आहे.
अनफिट ट्रॉलींमुळे अपघातांची मालिकाराज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री विविध रस्त्यांवरून फिटनेस नसलेल्या असंख्य ट्रॉलींद्वारे ऊस वाहतूक केली जाते. रिफ्लेक्टर नसणे, क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणे, अनुभवी चालक नसल्यामुळे पाठीमागून येणार्या वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे.
ऊस वाहतूकदारांनी हे करावेच
ट्रॉलीला चहूबाजूंनी रिफ्लेक्टर (अंधारात चमकणारे रेडियम) लावावे.मर्यादेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करू नये.ऊस वाहतूकीपूर्वी वाहनांच्या टायरची हवा तपासावी.अचानक वळण घेऊ नका.ट्रॉलीला इंडिकेटर बसवा.