स्व.पतंगराव ‌कदम यांचे स्वप्न साकार | – विश्वजित कदम | श्रीपती शुगरचा पहिला गाळित हंगामाचा शुभारंभ

0
डफळापूर,संकेत टाइम्स : श्रीपती शुगर अँड पॉवर लिमिटेड डफळापूर (ता जत) या साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम शुभारंभ भारती विद्यापीठ पुणेच्या शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, माजी मंत्री आ.विश्वजीत कदम,आ.मोहनशेठ कदम,आ.विक्रमसिंह सांवत,जिल्हा बँक संचालक महेंद्र लाड यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले,
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम साहेबांचे श्रीपती शुगर हे एक स्वप्न होतंय. त्यासाठी माझ्या सहित आ.विक्रम दादा सावंत, महिंद्र आप्पा लाड यांनी प्रयत्न केले आणि ही स्वप्नपूर्ती होत आहे. या कारखान्यामुळे  या भागातील ऊस तर गाळप होणारच आहे पण त्याचबरोबर या भागात रोजगार सुध्दा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
Rate Card
या कारखान्याची उभारणी १ ऑगस्ट २०२० रोजी स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांचे प्रेरणेतून झाली असून, कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता २५०० मे. टन इतकी आहे. तसेच, १२ मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्याच बरोबर आगामी काळात केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणानुसार, आसवानी प्रकल्पसुद्धा कारखान्यामार्फत सुरु करण्यात येणार आहे.
कदम म्हणाले,सद्यस्थितीमध्ये जत व कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये १४,००० हेक्टर क्षेत्रावरती ऊस लागवड आहे. या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांना वेळत ऊस गाळप करण्याची सतत चिंता सतावत होती. या कारखान्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा ऊस गाळपाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. तसेच या कारखान्यामुळे दोन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणेस मदत होणार आहे. त्याचप्रमाणे रोजगार निर्मीतीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

 

कदम पुढे म्हणाले,कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस लागवडी संदर्भात सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणेसाठी कारखाना ऊस विकास कार्यक्रम राबविणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ऊस लागवडी क्षेत्र वाढण्यास मदत होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.