शिवाय त्या गावातील लोकांशी सोयरीक नातेसंबंध करत नाहीत. नियोजित उमदी या तालुक्याची नव्याने स्वतंत्र निर्मिती होण्यासाठी तालुक्यातील सुमारे ४० हून अधिक ग्रामपंचायतीचे ठरावही झालेले आहेत. वरील वस्तुस्थिती प्रमाणे जत तालुका व भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने व प्रचंड लोकसंख्या असल्याने जत तालुक्याचे जत, उमदी व संख असे त्रिभाजन होवून स्वतंत्र उमदी या तालुक्याची निर्मिती व्हावी याकरीता आपले स्तरावर योग्य ती लवकरात लवकर कार्यवाही व्हावी असेही निवेदनात म्हटले आहे.