राज्यातील शिक्षक,शिक्षकेतरांचे रखडलेले पगार होण्याचा मार्ग मोकळा

0
23



जत,संकेत टाइम्स : राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराबद्दल आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून चर्चा केली होती. शालार्थमध्ये बदल होईपर्यंत प्रचलित पद्धतीनुसार वेतन करण्याची विनंती केली होती.अखेर त्यासंदर्भात हालचाली होऊन शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगारचा मार्ग मोकळा झाला आहे,अशी माहिती शिक्षक भारतीचे  यांनी कार्याध्यक्ष सुभाष मोरे व दिगंबर सावंत यांनी दिली आहे.  






शालार्थ प्रणालीमध्ये बदल न झाल्यामुळे राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार थांबले होते. यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परवानगी घेतल्यानंतर वित्त विभागाने तशी तात्काळ परवानगी देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार शुक्रवारी शिक्षण विभागाला पुढील दोन महिन्यांपर्यंत शालार्थमध्ये बदल करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. 





त्यामुळे पगार वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. कोषागार कार्यालयाने शुक्रवारी शिक्षण विभागाची बिलं स्वीकारली. उद्या शनिवार असल्यामुळे सोमवारपासून पगार वितरणाला सुरवात होईल, पुढील दोन, तीन दिवसात ते शिक्षकांच्या खात्यावरही जमा होतील, असंही मोरे यांनी सांगितलं.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here