जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील काही नेत्यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेेेेतल्याने चर्चेला उधान आलेे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी मुचंडी येथील राष्ट्रवादी नेते रमेश पाटील यांच्या कन्येच्या लग्न कार्यासाठी आले होते.
लग्नाआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जत येथील विश्रामगृहावर बैठक घेतली. बैठकीला राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे,चन्नाप्पा होर्तीकर, उत्तम चव्हाण, तालुकाध्यक्ष धोडमनी आदी नेते उपस्थित होते. दरम्यान बैठकीत जनसुराज्यचे नेते बसवराज पाटील, माजी सभापती मन्सूर खतीब,नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष इकबाल गवंडी,माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती. तब्बल तासभर प्रदेशाध्यक्ष पाटील व या नेत्यांच्यात संवाद झाला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीने जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषत: हे काँग्रेसशी संबंधित काही नेते आहेत. त्यांची राष्ट्रवादीशी जवळीक चर्चेचा विषय आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तालुक्यातील नेते,कार्यकर्त्यांशी यावेळी संवाद साधला,भविष्यातील लोकसभा,विधानसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका सांगितली सर्वांनी सतर्क राहून पक्षाचे काम तळागाळापर्यंत असे आवाहन केले.





