मासिक सभेत अधिकारी धारेवर,सदस्यांकडून प्रश्नाचा भडिमार : कामे होत नसतीलतर पं.स.बंद करा,सदस्यांची नाराजी

0
3

जत,प्रतिनिधी: पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही.मागील बैठकीत झालेले विषयांची अंमलबजावणी होत नाही.पंचायत समितीला पुर्णवेळ गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी नाहीत.सर्वच विभागात सावळा गोधळ पाह्याला मिळतो.त्यामुळे पंचायत समिती बिनकामाची बनली आहे.अशा शंब्दात काही सदस्यांनी मासिक बैठकीत नाराजी व्यक्त केली.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती मंगलताई जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
संख येथे प्राथमिक शाळेत विद्यार्थी धोकादायक इमारतीत बसतात.निर्लेखन करूनही मुलांची सोय होत नाही. त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. त्यांचे तक्रार करूनही अधिकारी बेदखल करत आहेत. पंचायत समिती सदस्यांना किंमत नसेलतर जनतेची कामे कशी होणार? सर्व अनागोंदी सुरू आहे अशी टीका भाजपच्या सदस्या कविता खोत यांनी केली.
अॅड.घेरडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.अतिरिक्त कार्यभार अाहे.तुम्हाला नेमके किती दिवस जतचा चार्ज आहे. अशा प्रश्नांचा भडिमार केला.अधिकारी, कर्मचारी, अपुरे शिक्षक,कर्मचारी, विकासकामांवर होणारे दुर्लक्ष यामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे.अशा सभातून काहीही होत नाही.त्यामुळे सभाच घेऊ नका अशा शंब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.यासह अनेक विषयावर चर्चा झाली.आजच्या सभेत चांगलाच खल पाह्याला मिळाला.
यावेळी उपसभापती शिवाजी शिंदे, सदस्य मनोज जगताप, रविंद्र सांवत,अॅड.आडव्याप्पा घेरडे,कविता खोत, श्रीदेवी जावीर,रामण्णा जिवन्नवार आदी सदस्य उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here