पालिका 6 वर्षाची झाली : रस्ते,पाणी,गटारी,समस्या कायम खड्डे,दुर्गंधीने नागरिक बेहाल
जत,विशेष प्रतिनिधी : जत शहरात ’मागील सहा वर्षांत विकास होवो न होवो ’मात्र खड्ड्यांचा विकास मात्र भरपूर झाला आहे. आता रस्त्यात खड्डे आहेत की,खड्ड्यात रस्ता हे सांगणे कठीण झाले आहे.नगरपालिकेने सहवा वर्धापन दिन साजरा केला खरा मात्र विकास कसा करणार हा प्रश्न निरूत्तरीत राहिला आहे.नव्याने सत्तेत आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात कधीतरी चांगले रस्ते होतील भाबड्या आशेवर असलेल्या नागरिकांच्या मात्र थेट मणक्याला दणका बसाला लागला आहे. नाका तोंडात धुरळा जाऊन जीव गुदमराला लागला आहे. पाच वर्षांत जे रस्ते केले त्यावरही खड्डे आणि जे रस्ते केले नाहीत, त्यावर तर खड्डेच खड्डे अशी दुर्दशा झाली आहे. खड्डे आणि त्याधून उडणाऱ्या धुरळ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगरपालिकेत सत्तास्थानी येऊन तब्बल आठ महिन्याचा कालावधीनंतर परिस्थिती जै-थैच आहे.रस्त्यावर खड्ड्याचा घेर वाढला आहे. निवडणूकीच्या आदी असणारे खड्डे दुप्पट बनले आहेत.तरीही रस्ता दुरूस्ती कडे दुर्लक्ष का?असा संप्तत सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कायम दुष्काळी असलेल जत तालुक्याला वाळव्याचे वाघ, शिराळ्याचे नाग व जतची मेंढरं’ असे म्हणून नेहमीच अपमानीत केले जाते. बाहेरच नेत्यांकडून जतच जनतेचा अपमान तर होतोच. मात्र तालुक्यातील नेत्यांनी त्याहूनही घोर कुचेष्टा चालविली आहे, असे सध्याच्या जत शहराच्या बकाल अवस्थेवरून दिसत आहे. जत तालुक्याची आण, बाण अन् शान असलेल्या जत शहराची बकाल नगरी करण्याचे पाप कोणाचे? असा सवाल आता मतदारांतून विचारला जाऊ लागला आहे.
45 हजार लोकसंख्या असलेल्या जतकरांना दररोजचे ताजे पाणी मिळू शकत नाही. चार ते पाच दिवसांनी एकदाच पाणी मिळते, तेही अशुध्द. गल्लीबोळात गटार नाही, की साधा रस्ता नाही. साचलेल्या सांडपाण्यावर डासांचे थैमान वाढत आहे. मलेरिया डेंग्यू व चिकनगुणीयाने शेकडो लोक हैराण झाले आहेत. वाहतुकीची समस्या, अतिक्रमणाचा विळखा, विकासाचा सत्यानाश, असे अतिशय भकास चित्र शहरात पहावास मिळत आहे.
सर्वात भीषण प्रश्न आहे तो शहरातील रस्त्यांचा. सार्वजनिक बांधकाम’ विभागाबरोबरच नगर पालिकेच्या आशीर्वादाने जत शहरात खड्डा नसलेला एकही रस्ता सध्या अस्तीत्वात नाही. काही भागात तर याठिकाणी एकेकाळी डांबरी रस्ता होता, असे सांगण्याची वेळ आली आहे. मध्यवर्ती बाजारातील भाजी मार्केट, गांधी चौक ते महाराणा प्रताप चौक, मार्केट यार्ड ते सोलनकर चौक, चिनगी बाबा ते वाचनाल चौक या महत्वाच्या ठिकाणी रस्ता औषधालाही राहिला नाही.
शहरातील रस्त्यावर एका फुटावर खड्डा अशी अवस्था आहे. केवळ छोटा खड्डा नसून दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधील अडथळ्यांची शर्यत पार करताना जतकरांचा जीव मेटाकुटीस आला आहे. अनेक जेष्ठ नागरिक, मणका, कंबर व सांधेदुखीचा त्रास असणारांची दुखणी वाढली आहेत. मणक्यामधील गॅप वाढण्याची समस्या उद्भवू लागली आहे. जनता दवाखानचे उंबरठे झिजवत आहे. काहीजणांना मोटारसाकल न चालविणचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे जतमधील रस्त्यांवरून तर अजिबात चालवू नका,असे ठणकावून सांगितले आहे.





