बनाळी,वार्ताहर: बनाळी ता.जत परिसरात म्हैशाळ सिंचन योजनातून पाणी सोडले जात असल्याने परिसर सुजलाम,सुफलाम होत आहे.लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे बनाळी परिसरातील कँनॉलची कामे गतीने पुर्ण झाली होती.गेली चार वर्षापासून आवर्तन सुरू होताच.बनाळी परिसरातील तलावे,वडापात्रातील बंधारे,भरून दिले जात आहेत.त्यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली आहे.शेतकऱ्यांच्या विहिरी,कुपनलिकांना मुबलक पाणी आहे.त्यामुळे परिसरातील शेती बहरली आहे.पुढील काही वर्षात शेती क्षेत्र सदन झालेला बनाळी परिसर दिसेल असे चित्र आहे.
बनाळी परिसरातील ओढे,नाले,तलावे म्हैशाळ सिंचन योजनातून सोडलेल्या पाण्याने भरून वाहत आहेत.





