बालगांव सत्तेतून जनतेचे प्रश्न सोडविणार : संगिता बगली

0
5

बालगांव सत्तेतून जनतेचे प्रश्न सोडविणार :

संगिता बगली

उमदी,वार्ताहर : बालगांव (ता. जत) येथे भाजपा प्रणित श्री.अल्लमप्रभु व अमोगसिध्द ग्रामविकास पॅनल च्या सरपंच पदी सामान्य कुटुंबातील निवडून आलेल्या उमेदवार सौ.संगीता रमेश बगली ह्या 118 मतानी विजयी झाल्या आहेत. शारदा सायबाण्णा गुरव ,गौराबाई मल्लाप्पा अरसगोंड ,मल्लाम्मा विठ्ठल कोळी ,पराप्पा बसाप्पा माळी या चार भाजपाच्या सदस्याना देखील घवघवीत यश मिळाले आहे.त्यामुळे बालगांव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवित सत्तातंर केले आहे.

पॅनल प्रमुख सायबाण्णा मुचंडी (पैलवान) म्हणाले की,गेल्या अनेक वर्षा पासून सत्ताधारी पक्षाकडून बालगांव गावाचा अपेक्षित विकास न झाल्याने यावेळी भाजपा पुरस्कृत सौ. संगीता बगली यांना मतदारांनी प्रचंड बहुमताने विजयी केले आहेत. दिल्ली पासून गल्ली पर्यंत भाजपचे सत्ता असल्याने विकास नक्की होणार आहे. त्यामुळे गावाचा सर्वागीण विकास करणे हाच आमचा ध्यास आहे. प्रामुख्याने स्वच्छ पाणी,गटारी,मजबूत रस्ते,शौचालये,गाळे,ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढ,बालगांव-सांगली बस सुरू करू,असे गाव विकासासाठी आमचा प्रयत्न राहिल.यावेळी शिवानंद पाटील महेश पाटील,उत्तम सलगर, सुरेश बडची, आमसिध्दा नडहट्टी,संजय कांबळे,कल्लाप्पा गड्याळ,संगप्पा तेलसंग, हणमंत मनंकलगी, सुभाष कर्की,श्रीशैल हिरेमठ,राम सलगर,उत्तम गुरव, रविकांत कुंभार चिदानंद सुतार, सुरेश मांग,भीमशा बोर्गी,शरणु बोर्गी चंद्रशेखर जतकर, मलकारी माने,औधुसिध्द माने,भैरु बिरादार, गुरबसु कोटी, रामचंद्र पाटील व तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्र संचलन डि एस कोटी केले तर आभार प्रल्हाद लोणी यांनी मानले.

बालगांव ग्रामपंचायतीच्या विजयी उमेदवारांचा आ. विलासराव जगताप यांनी सत्कार केला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here