जत,प्रतिनिधी : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कालपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.जत
तालुक्यातही रेकार्ड ब्रेक पाऊस झाला आहे. त्यातच गुरूवारी सकाळपासून जत तालुक्यात नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला.संपूर्ण दिवसभर नेटवर्क गुल झाल्याने अनेकजण ऑऊटऑफ रेंज झाले आहेत.ग्राहकांनी कालपासूनच कंपनीकडे तक्रार केल्या आहेत.
मात्र, त्यांना कंपनीने लवकरच सुरु केले जाईल, तांत्रिक अडचण असल्याचे उत्तर दिले आहे. मात्र, आज सायकांळपर्यत त्या ग्राहकांना नेटवर्कची वाट पहावी लागली आहे.व्होडाफोनच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन शाळा व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.







