खोल बोअसवेल्स संपवतायंत ठेंंब न् ठेंब पाणी, पाण्याच्या शोधासाठी शेतकर्यांची जिवघेणी कसरत
जत,प्रतिनिधी : उन्हाची तीव्रता वाढत आहे, तसतशी विहिरी, धरणो, पाझर तलावांनी तळ गाठला आहे. परिणामी उभी बागायती पिके, जनावरे जगविण्यासाठी विहिरीत उभी-आडवी बोअर घेऊन पाण्याचा शोध घेतला जात आहे. जमिनीवरदेखील बोअरवेल करण्याचे प्रमाण वाढल्याने जमिनीची अक्षरश: चाळण होत आहे. उन्हाळ्यात सर्वच परिसरातील शेतकर्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या बागायती पिकांना व जनावरांना जगविण्यासाठी प्रत्येक शेतकरी आपापल्या पद्धतीने पाणी आणण्यासाठी प्रयन्त करत आहे म्हणून आपल्या शेतातील विहिरीत किंवा पडीत जागेत मिळेल, तिथे पाण्यासाठी बोअरवेल करत आहे. जत तालुका डोंगराळ असल्याने पाण्याऐवजी खडकाची राखच मिळत आहे. |
भविष्यातील पाण्याची अडचण रोखायची असल्यास, जलसंधारणाच्या लहान-मोठय़ा कामांना जाणीवपूर्वक मोठा निधी दिली पाहिजे. दुष्काळ निवारणाच्या दीर्घकालीन योजना हाती घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे. पाणी अडविण्याचा यशस्वी प्रयोग करणार्या जलतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाचीही जोड द्यावी आणि पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याच शिवारात अडविण्यासाठी लोकचळवळ निर्माण करावी लागेल. त्या चळवळीसाठी पुढाकार घेणे ही काळाची आहे.
मन्सूर खतीब,माजी सभापती,पंचायत समिती,जत