जत | वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |

0

– जत तालुक्यातील बागलवाडी येथे जलसंधारण कामांची पाहणी व श्रमदान

सांगली : तीन वर्षापूर्वी जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. मात्र जलसंधारणाच्या कामामुळे हा तालुका हळूहळू टँकरमुक्त होवू लागला आहे. समाजाने मनावर घेतले तर काय परिवर्तन होवू शकतेयाचा प्रत्यय मला बागलवाडीत आला. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून धर्मजातगटपक्ष विसरून पाण्यासाठी लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे गावागावात परिवर्तन होवू लागले आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

जत तालुक्यातील बागलवाडी येथे पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी नंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Rate Card

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेएखाद्या योजनेला जनतेची साथ मिळत नाहीती योजना जनतेची होत नाहीतोपर्यंत ही यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजनेला जनतेची साथ मिळावीलोकसहभाग वाढावायोजना लोकांना आपलीशी वाटावीअशी योजना आखली. या योजनेला अमीर खान यांच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेची साथ मिळाली.  या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावीच्या ग्रामस्थांनी जलसंधारणाचा एकच ध्यास घेवून श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवूनजिरवलायाच धर्तीवर 75 तालुक्यातील हजारो गावे झपाटून काम करीत आहेतयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेतीन-साडेतीन वर्षापूर्वी राज्यात 52 टक्के भाग अवर्षणप्रवणदुष्काळी होता. कितीही मोठी धरणं बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणं आवश्यक आहेतचपण त्याचबरोबर विकेंद्रित पध्दतीने पाणलोटाचे स्त्रोत निर्माण करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली. यावर्षी 6 हजार गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीज राज्यातील जवळपास 20 हजार गावे दुष्काळमुक्त  झालेली असतीलअसा विश्वास व्यक्त करून याचे श्रेय जनसहभागाला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेबागलवाडीच्या ग्रामस्थांसह हजारो नागरिकांनी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले व दुष्काळाला पराभूत केले. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले आहेअसे स्पष्ट करून त्यांनी बागलवाडी गावाला बागांचे गाव करण्यासाठी प्रयत्नशील असून जलसंधारणाच्या कामासाठी एकत्र येणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहेअशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री यांनी केले श्रमदान

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हातात पाटी व खोरे घेवून श्रमदान केले. त्यांना आमदार सुरेश खाडेआमदार विलासराव जगतापशांतीलाल मुथा यांच्यासह अन्य मान्यवरांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे श्रमदान करणाऱ्या नागरिकानांही प्रेरणा मिळाली.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवीपाटीलमाजी महापौर सुरेश पाटीलनीता केळकरगोपीचंद पडळकरजतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरेमिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरातपाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणालेतहसिलदार अभिजीत पाटीलबागलवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगतापआमदार सुरेश खाडेजिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुखविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटीलप्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाणजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मामाजी आमदार पृथ्वीराज देशमुख,  पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळसत्यवान देशमुखजैन फाऊंडेशनचे शांतीलाल मुथा आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.