जतच्या राजकारणातील तरूण पिढीमध्ये कर्तबगार असलेले नेतृत्व म्हणजे विक्रमसिंह सांवत. त्यांना त्याच्या घराण्यातून सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा प्राप्त झाला आहे. ते राजकारणात येऊन आता 20 वर्षे होऊन गेली आहेत.गेल्या 20 वर्षात त्यांनी राजकीय पटलावर वेगळपण जपत वेगळा ठसा,जिवाभावाची कार्यकर्त्याची फळी निर्माण केली आहे. राजकारणात प्रांरभी आलेले अपयश पचवून तालुक्यात दादांनी केलेले राजकीय वर्तुळ कसलेल्या राजकरण्यांनाही आदर्श वाटावे असे आहे. उमदी जिल्हा परिषद मतदार संघातून राजकारणात आलेले दादा जत तालुक्यातील कॉग्रेसचे नंबर वन नेते स्वकृत्वाने बनले आहेत. राजकारणातला आपला माणूस म्हणून दादांना जनतेचा मोठा जनाधार लाभला आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावात दादांच्या समर्थकांनी सत्ताकेंद्रे मिळविली आहेत. राजकारण करताना आपला कार्यकर्त्याला बंळ देत सामाजिक बांधिलकी दादांनी कायम जपली आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिंशी ठामपणे राहणारा निस्वार्थ नेता म्हणून दादा उल्लेख करावा लागेल.जतच्या राजकारणातील विस्कटलेली घडी बसवून कॉग्रेसला बळकंट नव्हे तर तालुक्यात नंबर वन बनविण्यात दादाचे कार्य महत्वाचे आहे. कोणत्याही निवडणूकीत स्वता: कार्यक्रर्ता म्हणून विक्रमसिंह सांवत मैदानात असतात. जनतेला दिलेल्या आश्वासनाला जागणारा नेता म्हणून दादांचा नावलौकिक आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूकीत ते आधोरिखित झाले आहे. समोर तुल्यबंळ उमेदवार व विरोधकांची हवा असतानाही दादांनी मैदानात उतरताच हवा बदलवून जतचे थेट नगराध्यक्ष सह पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी केलेला प्रचार खरचं राजकारणातील प्रतिभावंत नेता करू शकेल असा आहे. जत शहरात दादांना माननारा मोठा गट दादांसाठी प्रंसगी कोणत्याही अपेक्षाविना दादाच्या पाठिशी असतो. हे नगरपालिका निवडणूकीत स्पष्ट झाले आहे. तसेच तालुक्यातील राजकारणात चित्र उमटले आहे. ग्रामपंचायती निवडणूकीत कॉग्रेला नंबर वन बनविलेच आहे. जत तालुक्यातील राजकारणात आता विक्रमसिंह सांवत हे आमदार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. जेथे सत्ता मिळाली तेथे कायापालट करण्याचे काम विक्रमसिंह सांवत यांनी केले आहे. बाजार समितीतील बद्दल हा दादांनी केलेल्या शेतकरी हिताच्या कामांचा भाग आहे. सांगली जिल्हात आदर्श ठरेलं अशी बाजार समिती निर्माण करण्याचे काम राजे विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवारात सुरू आहेत.जतच्या जनतेची तळमळची जाणिव असलेल्या दादांनी जो कामाचा धडाका लावला आहे. तो जत तालुक्याचा सर्वागिंन विकासासाठी कामय असेल एवढे निश्चित.
जत तालुक्यातील पुर्व भागातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी कर्नाटकातील पाणी योजनेतून जत तालुक्यातील 42 गावच्या महत्वपुर्ण पाणी योजनेस आजपासून मुर्त स्वरूप येणार आहे. जत तालुक्यातील विकासात विक्रमसिंह सांवत यांचेच मोठे योगदान यापुढे जतला प्रगतीवर नेहण्यासाठी महत्वाचे ठरेलं.
– बाबासाहेब माळी,
चेअरमन श्री. दत्त पतसंस्था, डफळापूर
फोटो
जतसाठी कायम प्रयत्नशील असणारे विक्रमसिंह सांवत यांनी पुर्व भागातील पाणी योजनेसाठी कर्नाटक व महाराष्ट्र सरकारदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.त्यांचीच हि वास्तवदर्शी छायाचित्रे 1 महाराष्टाचे जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांना सांगली येथे कार्यक्रामात,तर कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम.बी. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत माहिती दिली.
Attachments area