जत, प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीत तिंरगी लढत होत आहे. प्रत्यक्षात प्रचार शिगेला पोहचला आहे. एकमेकांवर आरोप-पत्यारोप होत आहे.विकास कामे,भष्ट्राचार, भष्ट्र टोळी, व्यक्तिगत पातळीवर जाऊन आरोप होत आहेत. नेमके हे सर्वकाही विकास कामे करण्यासाठी चालू आहे. का?स्व:ताच्या घोडा दामटायचा या उद्देशाने चालू असल्याचे दिसते आहे.नेमक्या विकासाच्या गप्पा मारतांना सत्तेत असूनही का झाला नाही विकास हा संशोधनाचा विषय आहे. मात्र मोठ्या संख्येने घोषणा करणारे तिन्ही पक्ष सत्ता भोगून पुन्हा विकास झाला नाही,विकासासाठी पुन्हा निवडून द्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे. यावर जनतेतून तर्क लढविले जात आहेत.





