शिक्षक मित्रानों, शासनाला काय करायचे ते करू द्या

0
4

शिक्षक मित्रानोंशासनाला काय करायचे ते करू द्या

राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेचा घोळ आता संपुष्टात आल्याचे दिसत आहेपरवाच ग्रामविकास खात्याचे सचिव असिम गुप्ता यांनी राज्यातल्या जिल्हा परिषद सीईओंशी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली.यात शासन बदलीवर ठाम असल्याचे दिसलेत्यामुळे शिक्षकांच्या बदल्या तब्बल सहा महिन्यानंतर होणार आहेत,हे आता स्पष्ट झाले आहेया बदलीप्रकरणी शासनाने वरच्या कोर्टात स्टे  येऊ नये यासाठी कॅव्हेट दाखल केले आहे.मात्र आता शिक्षक संघटना वेगळाच मुद्दा घेऊन कोर्टात जाण्याची भाषा करत आहेनियमानुसार ज्यांनी शिक्षकांना नेमणुका दिला,त्यांनाच बदल्याच अधिकार आहेअसा मुद्दा या शिक्षकांनी उपस्थित केला आहेत्यांच्यामते ग्रामविकास खात्याला बदल्यांचा अधिकारच नाहीते कशी काय बदली करू शकतातअसा त्यांचा प्रश्न आहेअर्थात हे तांत्रिक मुद्दे आहेतशासन यावर नक्कीच तोडगा काढेल,त्यामुळे बदल्या या होतीलच.त्यामुळे फार ताणत बसण्यापेक्षा शासनाला एकदा काय करायचे आहे,ते करू द्याअसेच म्हणायची वेळ आली आहे.

ग्रामविकास खात्याकडून शिक्षकांना पगार अदा केला जातोस्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संस्था राज्याच्या ग्रामविकास खात्याअंतर्गत येतात.त्यामुळे उगाच कुठला तरी तांत्रिक मुद्दा घेऊन ऊठसुठ शासनाच्या विरोधात कोर्टात जाणे,योग्य नाहीशासन बदलीला ठाम आहेकितीही शिक्षकांच्या संघटनांनी प्रयत्न केला तरी बदल्या या होणार,हे स्पष्टच दिसत आहेउलट वारंवारच्या कोर्ट फेर्याने शासनही इरेला पेटले असल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहेशासन स्तरावर एवढ्या मोठ्या पद्धतीने आणि ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया पहिल्यांचाच होत आहे.वास्तविक एकादी नवी योजना राबवत असताना काही प्रमाणात त्रुटी या राहणारच आहेत,मात्र त्या दूर करण्याचा आणि त्यातून बदल्यांमध्ये काही शिक्षकांवर अन्याय झाला तर त्या शासन स्तरावर दूर केल्या जातीलहीनाही तर अन्यायाविरोधात शासनाला कोर्टात खेचण्याचा अधिकार शिक्षकांना आहे.त्यामुळे या बदली प्रकरणांमुळे शिक्षक संघटनांना जी भिती आहेती बदल्या झाल्याशिवाय लक्षात येणार नाहीतया बदल्यांबाबत शासनस्तरावरही ठोस अशी भूमिका स्पष्ट नाही,पण जो पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण होणार नाहीत,तोपर्यंत त्यातल्या त्रुटी स्पष्ट होणार नाहीत.त्यासाठी बदल्या पहिल्यांदा होण्याची गरज आहे.

ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे आता शिक्षकांच्या बदल्यांमध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती किंवा आमदारखासदार यांचा हस्तक्षेप यापुढे होणार नाही.बदल्या या पारदर्शी होणार आहेत.त्यामुळे ज्यांच्यावर सतत अन्याय झाला आहे,त्यांना यातून दिलासा मिळणार आहे,तर ज्यांनी राजकारण्यांना हाताशी धरून अगदी घराजवळशेताजवळ नोकर्या केल्या त्यांची काही प्रमाणात अडचण होणार आहेया बदल्यांमध्ये 20 गावे मागण्याचा अधिकार शासनाने दिला आहे.त्यामुळे शिक्षकांची फार मोठी अडचण होणार नाहीकाही दोनतीन टक्के शिक्षकांची गैरसोय होईलअर्थात दर बदल्यांमध्ये होत आली आहेतरीही त्या दूर करण्यासाठी मार्ग असणार आहे.

शासन राज्य स्तरावर पहिल्यांदाच ऑनलाईन आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बदल्या करत आहेत्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार वाढले.यासाठी शिक्षकांना मोठा मनस्ताप झालाशासनाला सातत्याने बदली सॉफ्टवेअरमध्ये बदल आणि विकसित करावा लागत आहेवास्तविक शासनाने प्रायोगिक पद्धतीने एकादा जिल्हा या बदली प्रक्रियेसाठी घेण्याची गरज होती,त्यामुळे त्यांना येणार्या अडचणी समजल्या असत्या आणि त्यानुसार बदल करून ते राज्यभर राबवता आल्या असत्याएकदम मोठा घास घेतला की,त्रास हा होणारचतसा त्रास सगळ्यांनाच झालाशिवाय त्यात शिक्षक आणि त्यांच्या संघटना बदल्या थांबवण्यासाठी कोर्टात गेल्या,त्यामुळे ही प्रक्रियाही लांबत गेलीअन्यथा आतापर्यंत या बदल्या कधीच झाल्या असत्याशिक्षक कोर्टात घेतल्याने शासनाने काही पावले मागे घेत फक्त पहिल्या तीन संवर्गाच्या बदल्या करण्यास राजी झाले होतेत्यामुळे प्रत्येक मोजक्याच बदल्या होणार होत्यामात्र शिक्षकांनी संवर्ग चारवर यामुळे अन्याय होतोयअशी भूमिका घेत पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावलेशेवटी कोर्टाने सगळ्याच संवर्गाच्या बदल्या कराअसा आदेश देऊन आपल्या निर्णयावर ठाम राहण्याच्या सूचना शासनाला दिल्यात्यानुसार आता सर्वच संवर्गाच्या बदल्या होणार आहेतसंवर्ग चारच्या बदल्या मे 2018 मध्ये होणार होत्या आता त्या शिक्षकांच्या आगाऊपणामुळे आता लगेच होणार आहेतयात शिक्षक आणि शिक्षक संघटनांचा आततायीपणा नडलाआता तरीही शिक्षक संघटना शिक्षकांचा कैवार घेऊन कोर्टात जाण्याची भाषा करत आहे.त्यामुळे आता त्यांना गप्प बसाअसे म्हणण्याची वेळ आली आहेशासनाला एकदा काय करायचे ते करू द्या.बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उदभवलेल्या त्रुटीसाठी संघर्ष करा आता गप्प राहाअसा सुज्ञ सल्ला देण्याची गरज निर्माण झाली आहेशिक्षकांनीही आता वेट आणि वॉचचे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे.

मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here