फक्त अपघातातील रुग्णासाठी रुग्णालयशासनाने लाखो रूपये खर्चून मोठी इमारात,डॉक्टर,नर्सेस,कर्मचारी नेमले आहेत.मात्र सर्वांचा हलगर्जीपणा,राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष यामुळे शहरातील एकमेव शासकीय रुग्णालय अखेरची घटका मोजत आहे.अपघातग्रस्त,कोरोनाचे रुग्ण वगळता अन्य रुग्णांना उपचार मिळत नसल्याने रुग्णालय बिनकामाचे ठरत आहे.