अवकाळीने द्राक्ष घड कुजण्याची भिती | बागायतदार चिंतेत
जत : दोन वर्षाच्या लॉकडाउन आणि गुलाब गारपीठाने पावणे जवळपास हाजारो हेक्टरवरील दणक्यातून शेतकरी सावरत नाही तोच, ऐन द्राक्ष फळ पक्व होण्या अगोदरच गत चार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पाणी फिरविले. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारीपासून सुरू झालेल्या पावसाने शेती पिकांचे नुकसान केले.तालुका भरातील द्राक्ष, भाजीपाल्याच्या नगदी पिकांना पावसाचा फटका बसला आहे.