अरे बापरे !! एसटी संपामुळे खाजगी वाहतुकीने राज्यात दररोज 40 अपघाती मृत्यू !                                                             

0

 

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने व सरकारच्या नीष्काळजीपणाने संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते. कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप हाताळण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते.तब्बल 54 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यात निरंकुश, बेकायदेशीर खाजगी वाहतूक खुलेआम सुरू आहे.यामुळे नोव्हेंबर महिन्यात रस्ते अपघातामध्ये वाढ झाली असून दररोज 40 प्रवाशांना अपघातामध्ये आपला प्राण गमवावे लागत आहे.

 

 

यावरून असे दिसून येते की एसटी संपामुळे बेकायदेशीर खाजगी वाहतूकदारांना सरकारने खुली सुट दिली की काय असे वाटत आहे.महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात 2663 अपघात झाले.या अपघातामध्ये 1180 प्रवाशांचा मृत्यू तर 2774 प्रवासी जखमी झाले.हा आकडा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. एसटी संपामुळे काळी-पिवळी जीप,मॅक्सीकॅब,वडाप, टेम्पो-ट्रॅव्हलर, खासगी बस यांनी बेधडक खुली प्रवासी वाहतूक सुरू केली आहे आणि यावर सरकारचे काहीच नियंत्रण नसल्याने अपघातात मोठ्या वाढ होतांना दिसत आहे.कारण या वाहनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात.

 

 

 

यामुळे रस्ता सुरक्षा नियम पायदळी तुडवून अपघात वाढतांना दिसत आहे.नोव्हेंबर महिन्यात सरासरी पेक्षा अधिक अपघात आणि मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.खाजगी वाहनचालक संपाचा पुर्णपणे फायदा घेत आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतुन प्रवास, वेगाने वाहने चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबने,गाडी चालवताना मोबाईलचा वापर करने, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही रस्ते अपघाताची मुख्य कारणे आहेत.नोव्हेंबर महिन्यात  सोलापूर जिल्ह्यात 81 मृत्यू, नाशिकमध्ये 72 मृत्यू, पुणे 65 मृत्यू, अहमदनगरमध्ये 52 मृत्यू,, नागपूर जिल्ह्यात 44 मृत्यू ,औरंगाबादमध्ये 41 मृत्यू तर मुंबई शहरात 31 मृत्यू ह्या वाढत्या अपघातांना एसटी कर्मचाऱ्यांचा संपच कारणीभूत असल्याचे दिसून येते.महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप पुर्णपणे हाताळण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसुन येते

 

 

 

आणि त्यांचाच संपूर्ण फायदा खासगी वाहतूक चालत घेत आहेत.परंतु खासगी वाहतूक सुरक्षित नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.एसटी जर सुरळीत सुरू रहाल्या असत्या तर यदाकदाचित एवढे अपघात टाळता आले असते.कारण महाराष्ट्रातील संपूर्ण प्रवाशांचा एसटी वर एवढा दृढ विश्वास आहे की अपघात नाहीच्या बरोबरीनेच असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास सुरक्षित,सुलभ,समाधानी व आनंददायी वाटतो.संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी व महाराष्ट्र सरकारने प्रवाशांच्या बाबतीत संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते.परीवहन मंत्री अनिल परब ठोस पाऊल उचलत नसल्याने ते राज्यातील प्रवाशांच्या प्रती निशक्रीय दिसतात.त्याचप्रमाणे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे तालमेल नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप दीवसेंदीवस चिघळत आहे.आता शंका आहे की परब परिवहन मंत्री आहेत की आघाडी सरकारचे परिवार मंत्री आहेत.

 

 

 

54 दिवसात करोडो प्रवाशांचे हाल झाले आणि होत आहे.त्याच सोबत महाराष्ट्राचे करोडो रुपयांचे नुकसान सुध्दा झाले.तरीही संपकरी कर्मचारी अडुनच आहे.महाराष्ट्रात तब्बल तीन नामांकित पक्षांची सरकार(महाविकास आघाडी)असुनसुद्धा संपावर तोडगा निघता-निघत नाही हे महाराष्ट्रातील प्रवाशांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.आता महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न आहे की खासगी वाहतूकदारांसोबत सरकारची साठगाठ तर झाली नसेल!कारण अजूनपर्यंत लालपरीची चाके रुळावर आलेली दिसत नाही.त्यामुळे सरकारला आग्रहाची विनंती आहे की खासगी वाहतूकीचे वाढते अपघात रोखण्यासाठी एसटीचा संप ताबडतोब संपुष्टात आणावा.कारण एसटीच्या संपामुळेच रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.राज्यात सुरक्षित व सुलभ प्रवास सरकारकडुन मिळत नसल्याने महाराष्ट्रातील तळागाळातील प्रत्येक प्रवासी अत्यंत दु:खी व चिंतेत आहे याकडे सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.                                                        

Rate Card

 

रमेश कृष्णराव लांजेवार

(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)  

मो.नं.9921690779

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.