अतिवृष्टीचे चटके शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहेत . चारा टंचाई मुळे शेतकरी हैराण झाले आहेत . शिवाय पशुखाद्य महाग झाल्यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे . पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने यंत्रयुगीन शेती महागडी झाली आहे . निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे . नापिकी व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे .शेतकरी रमेश शिंदे
२ ते ३ वर्षांपूर्वी गोडतेल , ज्वारी , दाळी , पेट्रोल , आधी वस्तूंचे भाव कमी होते . त्यामुळे आम्ही सालगडी म्हणून शेतकऱ्यांच्या शेतात ६० ते ७० हजार रुपये मध्ये वर्षभर कष्ट करायचो . मात्र सध्या सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आता गगनाला भिडले आहेत . त्यामुळे आता ६० ते ७० हजार रुपये मध्ये आमची उपजीविका भागत नसल्यामुळे आम्ही १ लाखाच्या पुढे पगार घेत आहोत .सालगडी उमाकांत कांबळे
Next Post