चांगले मार्गदर्शन करणारा प्रत्येक व्यक्ती आपला खरा “गुरू”

0
प्राचीन काळापासून  गुरूच्या स्मरणार्थ आषाढ महिन्यातील “पौर्णिमा”साजरी करण्याची परंपरा गेल्या 5 हजार वर्षांपूर्वीची आहे.त्यामुळेच भारतात गुरूपौर्णिमेला आगळेवेगळे महत्व असल्याचे आपल्याला दिसुन येते.गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनीच गुरू या शब्दाचा मान-सन्मान करने अत्यंत गरजेचे आहे.कारण “गुरू शिवाय ज्ञान नाही”ही म्हण सत्य आहे.गुरू पोर्णिमेचे महत्व जाणून चांगले विचार आचरणात आणायला हवे. गुरूचे महत्व म्हणजे ज्यांच्यापासुन आपल्याला चांगल्याप्रकारची चालना,गुण, शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन,प्रेम, जिव्हाळ्याच्या गोष्टी इत्यादींचे  जो व्यक्ती चांगले आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करतो तोच आपला खरा गुरु समजायला पाहिजे.

 

आई-वडिल हे गुरू या परीभाषेपेक्षाही महान आहेत.जो पर्यंत सुर्य-चंद्र-आकाश-पाताळ आहे तोपर्यंत आई-वडीलांचा मान गुरू पेक्षाही महान आहे आणि राहील यात दुमत नाही.कारण आई-वडीलां समोर सर्वच नतमस्तक होतात आणि व्हायला हवे.आई मायेचे पांघरूण घालुन मुला-मुलींना लहानाचे मोठे करते तर वडील संपूर्ण कुटुंबाची ढाल बनून कुटुंबाचे रक्षण करण्याचे काम करीत असतो.त्यामुळे आपण नेहमी पहातो की छोटी दुर्घटना घटना घडली तर आपण “आईग” म्हणुन आईला हाक मारतो यामुळे आपले दु:ख कमी होते.त्याच्या विपरीत जर मोठी घटना घडली तर आपण “बापरे” म्हणतो.यावेळेस संपूर्ण गाव जमा होवुन धावुन येतो.अशाप्रकारे आई-वडीलांचे नाते किती महान व अनभिज्ञ आहे जगात दिसून येते. म्हणजेच या जगात जो आपले पालन-पोषन करतो तो आपला सर्वात मोठा गुरू आहे.म्हणजेच वडिलांचे नाते किती महान आहे हे आपण समजू शकतो.त्याचप्रमाणे आपण नेहमी पहातो की आई-वडीलांचा अपमान कोनीही सहन करीत नाही आणि करणार नाही.
अशा परिस्थितीत मुलं-मुली तुटून पडतात.यात खरे गुरु-शिष्याचे नाते दिसून येते.म्हणजेच जगाच्या पाठीवर सर्वात मोठे गुरू-शिष्याचे नाते म्हणजे आई-वडिलच.यात मोठा वाटा म्हणजे आई-वडीलांचे मुलांवरील संस्कार व मार्गदर्शन.यातुनच गुरू-शिष्याचा जन्म झाला.आई गुरूची भुमिका बजावुन वटवृक्षाच्या अफाट सावलीत मुलांची जोपासना करते तर वडील याच वटवृक्षाचा पहारेकरी बनुन परिवाराचे जतन व संरक्षण करते.मानसाच्या आयुष्यात अनेक उतारा-चढाव येतात, कठीण समस्या येतात,सुख-दु:खाच्या घटना घडतात.याकरीता वेगवेगळ्या मार्गदर्शनासाठी प्रत्येकाला गुरूची आवश्यकता असते.कारण गुरू शिवाय संपूर्ण मार्ग अधुरा असतो.
आपण शिक्षणाच्या क्षेत्रात जेव्हा पाय ठेवतो.तेव्हा शिक्षक आपला गुरुच असतो.कारण पुढील आयुष्याचे खरे मार्गदर्शन आपल्याला शिक्षकांपासुन मिळत असते.आपण शाळेतल्या पहिल्या पायरीपासुन तर शेवटच्या पायरीपर्यंत म्हणजे अंतीम शिक्षणापर्यंत शिक्षक आपला गुरूच असतो.कारण यांच्या पासुनच आपल्या बुध्दीमत्तेचा आणि पुढील वाटचालीचा मार्ग मोकळा होतो व आपल्याला पुढील दिशा आणि मार्ग दिसून येतात.त्याचप्रमाणे क्रीडाक्षेत्रात पदार्पण करतांना गुरूची अत्यंत आवश्यकता असते.कारण संपूर्ण क्रीडाक्षेत्राचे भवितव्य आपल्या गुरू विद्येवर अवलंबून असते.त्यामुळे आपण क्रीडाक्षेत्रात नेहमी पहातो की कुशलता, कर्तबगारी, उत्कृष्ट खेळाडू आणि पराक्रमी खेळाडू तयार करतांना गुरू-शिष्याची संपूर्ण कसोटी लावून आपली ताकद झोकल्या जाते. तेव्हाच पीटी उषा, कपिल देव, तेंडुलकर,दारासिंग,खली, मिल्खासिंग, मेजर ध्यानचंद असे अनेक नामांकित खेळाडू गुरूमुळेच तयार झाले आणि होतात सुध्दा.गुरूच्या परीक्षेत जो-जो पास होतो.
तीच शिष्यांकडून गुरू दक्षिणा असते.आपण महाभारत ते रामायणमध्ये गुरू-शिष्याचे काय नाते असते ते आपण जाणतोच.व्दापरयुग,सत्ययुग,कलयुग किंवा कोणतेही युग असो गुरू शिवाय पुढचा मार्ग निघने अवघड असते.याकरीता गुरूची आवश्यकता असने गरजेचे असते.राजकीय क्षेत्राचा विचार केला तर यातही आपल्याला गुरू-शिष्याचे नाते दिसून येते.यातुन राजकीय पुढारी तयार होतात.आपण पारतंत्र्यात असतांना स्वतंत्र लढा जिंकण्यासाठी क्रांतीकारकांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्याचा लढा उभा केला.त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात राहून मोकळा स्वास घेवु शकतो.कारण क्रांतीकारकांना गुरूचे मार्गदर्शन योग्य लाभले त्यामुळेच क्रांतिकारक शिष्यांनी भारताला स्वतंत्र मिळवून दिले.
त्यामुळे गुरू शिवाय कोणतेही काम होने शक्य नाही.याकरीता कोणतेही क्षेत्र असो अनुभव,ज्ञान,माहीती मिळवण्यासाठी गुरूची तेवढीच आवश्यकता असते.म्हणुनच म्हटल्या जाते “गुरू बिना ज्ञाण अधुरा”. त्याचप्रमाणे आपण पुजाअर्चना करतो याचे मुख्य कारण म्हणजे एकाग्रता निर्माण व्हावी.आपण आपले काम फत्ते व्हावे याकरिता देवी-देवता व पुर्वजांची पुजाअर्चना करतो.कारण आपण केलेल्या कार्याला यश प्राप्त झाले पाहिजे.भारत भुमित गौतम बुद्ध, ऋषीमुनी,त्यागी, साधुसंत,थोरमहात्मे होवुन गेले.याच्याच पाऊलावर पाऊल ठेवून योगा व व्यायामाच्या मदतीने आपले शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो.त्यामुळे आज भारताला योगाच्या बाबतीत विश्र्व गुरू म्हणुन संबोधल्या जाते.त्याचप्रमाणे भारताला विश्र्व शांतीचा गुरू सुध्दा संबोधल्या जाते.कारण जगाच्या पाठीवर शांतीपूर्ण देश म्हणजे भारताची जगात प्रचीती आहे.म्हणजेच आज भारत विश्र्व शांतीचा गुरू असल्याचे दिसून येते.
ह्या संपूर्ण घटनांचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संस्कृती, परंपरा,धर्माची जोपासना यामुळेच भारताला विश्र्व गुरू म्हणून संबोधल्या जाते.गुरू पोर्णिमेच्या निमित्ताने हेच सांगु इच्छितो की मुलांनी आई-वडीलांच्या सेवेला, त्यांच्या आज्ञेला व त्यांनी सांगितलेल्या कामाला प्रथम प्राधान्य देवून गुरू-शिष्याच्या नात्याची जोपासना सर्वांनीच केली पाहिजे.आताही भारतात गुरू शिष्याचे नाते अतूट आहे व टिकुन आहे याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संस्कृती, भारतातील अनेक धर्म,जाती-पंथ यांचा एकत्रित पणा यामुळेच आपल्याला गुरु-शिष्याचे नाते अधिक घनिष्ठ असल्याचे दिसून येते.शिष्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांच्या पासून आपण प्रेरणा घेतो,त्याची अवहेलना कुठेही होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.
यातच शिष्यांची महानता दिसून येईल.गुरू पौर्णिमेबद्दल एक गोष्ट सांगु इच्छितो की,परीवारापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही,आई पेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही,बहीनी पेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही,मित्राशिवाय आयुष्य नाही यात आपल्याला गुरूचा गोडवा कीती महान आहे ते आपल्याला स्पष्ट दिसून येते.म्हणजेच प्रत्येक परीवार गुरूची भुमिका आप-आपल्या परीने पार पाडत असते.त्याचप्रमाणे सर्वांनीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गुरू-शिष्याच्या नात्याला कोणीही कलंकित करणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.कारण गुरू-शिष्याच्या नात्यानेच आपण घडतो आणि घडवितो,आपला परिवार घडते व यातुनच देश घडतो.गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो की देशातील वाढते प्रदुषण,ऑक्सिजनचे कमी होत असलेले प्रमाण आणि ग्लोबल वॉर्मिगमुळे वाढणारा धोका रोखण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या परिसरात किंवा घरी वृक्षारोपण केले पाहिजे.ज्याच्या परिसरात जागा नसेल त्यांनी एखाद्या कुंडीमध्ये झाड लावुन वृक्षारोपण करायला हवे.कारण वाढते प्रदुषण मानव,जिवजंतू,वन्यप्राणी यांच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.त्यामुळे गुरू पोर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपणावर भर दिला पाहिजे.                  गुरूपोर्णिच्या हार्दिक शुभेच्छा!
                                                                                   रमेश कृष्णराव लांजेवार                          (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)                मो.नं.9921690779, नागपूर.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.