सिमाभागाचे प्रश्न सोडवा : आ.विक्रमसिंह सांवत
सांगली : सांगली येथे जिल्हा नियोजन बैठकीत जत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबी संदर्भात आ.विक्रमसिंह सांवत यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. नुकताच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद थांबला असला तरी शासनाने दिलेला शब्द पूर्ण होण्याच्या दृष्टीने तत्परतेने हालचाली केल्या जाणे गरजेचे आहे.
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)
जत तालुक्याच्या पाणी प्रश्नांबरोबरच काही आवश्यक असणाऱ्या बाबींविषयी बैठकीत प्रश्न मांडले असून ते लवकर निकाली निघावेत यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जावेत,अशी मागणी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे केली.