जत दिवाणी न्यायाधीश इ के चौगुले म्हणाले, अपघाती मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढले आहे.अपघात घडल्यानंतर याबाबतची माहिती पोलीस,शासकीय दावाखान्यांना वेळेत दिली जात नाही.परिणामी विलंब झाल्याने अपघातग्रस्तांचा मृत्यू होतो आहे. अपघातग्रस्त व्यक्तींचा मृत्यूला मला जबाबदार ठरवतील या कारणाने माहिती देणे टाळली जाते.म्हणून शासनाने नविन कायदा केला आहे.अशी माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाते,त्यांना कोणतीही माहिती विचारले जात नाही.त्यामुळे अशा घटना आपल्या आसपास घडल्यास तात्काळ पोलीस, शासकीय दवाखान्याना माहिती द्यावी,असे आवाहन न्यायाधीश चौगुले यांनी केले.
Prev Post