ग्रामीण भागातील महाविद्यालय बनतयं सैन्यभर्ती प्रशिक्षण केंद्र | एकाचवेळी १७ विद्यार्थी लष्करी सेवेत
जत,संकेत टाइम्स : मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. जी जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो, तो तितकाच यशाचा शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसांच्या संपूर्ण विकासासाठी आणि त्यांच्या मूलभूत अधिकारासाठी महत्वाची असते. तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे, ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण होय, असा मोलाचा सल्ला राजे रामराव महाविद्यालयातील ज्या विध्यार्थ्यांची भारतीय लष्करात निवड झाली आहे त्यांना शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी दिला.
