माणसातील देवमाणूस ; हभप तुकाराम बाबा महाराज

0



संत गाडगे महाराज यांचे शिष्य संत बागडे महाराज व संत बागडे महाराज यांचे शिष्य संत तुकाराम महाराज नुसते संतच नव्हे तर त्याला दैवत्व प्राप्त केलेले काही संतापैंकी एक संत म्हणजे तुकाराम बाबा,जत,मंगळवेढा तालुक्यातील सामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे देवताच..अशा दैवत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्त थोडक्यात..



प्रांरभीपासून तुकाराम बाबा महाराज यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. सामाजिक उपक्रम राबविले आहेत.जत तालुक्यात कोरोना काळात बाबांनी केले कार्य अकालनीय आहे.सलग दुसऱ्या वर्षी मास्क,सँनिटायझर, जीवनावश्यक वस्तूचे किट,भाजीपाला वाटप सुरू आहे.जत तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी माडग्याळ ते मुंबई पायी दिंडी काढून सरकारचे‌ लक्ष वेधले होते.त्यावर अजूनही बाबाचे काम सुरू आहे.

सांगली शहरामध्ये सन 2003 मध्ये 3 लाख दिवे एकाचवेळी लावण्याचा “लक्षदीय” तरूण भारत व्यायाम मंडळाच्या क्रिडांगणावर आयोजित केलाला होता.महाराष्ट्रातील मोठ-मोठे संत हजारो भक्त यावेळी उपस्थित होते.सांगलीतील हा भव्यदिव्य कार्यक्रम कायम स्मरणात राहणारा आहे.

जत सारख्या दुष्काळी भागामधील तालूक्यामधील प्रत्येक गावामध्ये पिण्याचे पाणी स्व:ताच्या टँकरने पुरविणे.टाक्याचे वाटप करणे,तीव्र दुष्काळातील जनावरे जगली पाहिजेत,पशुधन वाचविण्यासाठी स्व:ताच्या खर्चातून चारा छावणी सुरू करत केलेली मदत उल्लेखनीय आहे.गोरगरीबासाठी अन्नदान करणे,गोरगरिबासाठी शासनाच्या सहकार्याने घरकुल योजना राबविणे,अशी अनेक सामाजिक व धार्मिक कार्याद्वारे त्यांनी समाज कार्य अखंड सुरू ठेवले आहे.जत तालुक्यात स्वांतत्रापासून असलेला पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे.त्यासाठी शासनास जतकरांच्या भावना कळविण्यासाठी जत ते मुंबई पायीदिंंडी काढत सरकारचे लक्ष वेधले होते.पाणी द्या,अन्यथा मी लोकवर्गणीतून कँनॉल काढण्यासाठी परवानगी द्या,असे शासनास ठणकावून सांगणारे तुकाराम बाबा हे राज्यातील एकमेव आध्यात्मिक गुरू होत.  

गोधळेवाडी,भुयार येथील मठामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकास दररोज नाष्ठा,जेवन व राहण्याची सोय मोफत केली आहे. अनेक वर्षापासून हा उपक्रम अखंड सुरू आहे.

गोधळेवाडी येथील स्वता;च्या शेतामध्ये त्यांनी मठ बांधलेला आहे.गोरगरिबांच्या लग्नासाठी सोय व्हावी म्हणून एक भव्य असे मंगल कार्यालय बांधलेले आहे.याठिकाणीही भाविकांच्या राहण्यासह जेवनाचीही सोय केली आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूराचेवेळी अनेक गावामध्ये त्यांनी स्व:ता जावून जिवनावश्यक वस्तूचे वाटप करून अनेक लोंकाना आधार दिला होता.सध्या जगभर सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीतही बाबा जत तालुक्यातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

Rate Card

पोलीसांना चहा,नाष्ट्याची सोय, जीवनावश्यक वस्तू,मागील वर्षी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील 22 हजार कुटूंबियांना घरपोच भाजीपाला वाटप केला होता. यावर्षी पुन्हा तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात दररोज चार टन घरपोच भाजीपाला वाटप सुरू केला आहे.कर्नाटकातुन गडचिरोली येथे चालत जाणाऱ्या तरुणांना त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या गावी पाठवले होते. आरोग्य विभागालाही बाबांनी भरीव मदत केली होती.त्यांनी अशा अनेक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे.


शंब्दाकन ; राजू माळी


  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.