मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत राज्यात करोनाचं संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्बंधचा निर्णय निश्चित झाला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली.
राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून,दिवसा 144 कलम लागू (जमावबंदी)असेल, असं मलिक यांनी सांगितल.
मंत्रिमंडळातील दहा महत्त्वाचे निर्णय
शनिवार रविवार संपूर्ण लॉक डाऊन
हॉटेल फक्त पार्सलला परवानगी
रेस्टॉरंट बार बंद राहणार
चित्रपटगृह नाट्यगृह बंद
धार्मिक स्थळांसाठी गाईडलाईन
उद्याने बंद राहणार
उद्या रात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही
सार्वजनिक वाहतूक 50 टक्के आणि सुरू राहणार
शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन
काय सुरु, काय बंद
शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन
लोकल ट्रेन सुरू राहणार
जिम बंद होणार
अत्यावश्यक सेवांना परवनगी
रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार
अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी
रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील
सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद
गार्डन, मैदाने बंद
जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक
बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
टॅक्सीत मास्क घालावा
कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
*शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील*
प्रतिबंधित क्षेत्र तयार करा
सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार
20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी
लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित
विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार














