कधी देताय ?,अतिवृष्ठीची भरपाई सोमलिंग बोरामणी यांचा सवाल | तोंडाला पाने पुसण्याचे थांबवा

0



जत,प्रतिनिधी : बेंळोडगी परिसरातील शेतकरा सातत्याने निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत.एकीकडे शेतकरी अडचणीत असतानाही,अवकाळी,पिकविमा,दुष्काळी मदतीसाठी आम्हाला वगळण्यात येत आहे.आमच्या संयमाचा अंत प्रशासन व राजकीय पदाधिकारी बघत आहे,आम्ही आता संपलो आहोत.









संयमाचा अंत पाहू नका,असा इशारा बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन सोमलिंग बोरामणी यांनी दिला आहे.

गत वर्षात तीनवेळा अवकाळी,अतिवृष्ठीमुळे या परिसरातील द्राक्ष,डाळिंब,तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तीन्हीही वेळी प्रशासनाकडून पंचनाम्याचे सोपस्कर उरकण्यात आले आहे. मात्र एकाही वेळची भरपाई आम्हाला मिळालेली नाही.त्याशिवाय पिकविमा भरूनही लाभ मिळत नाही.आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत काय,प्रत्येक वेळी प्रशासनाकडून आम्हाला डावलण्यात येत आहे.


Rate Card









सत्तेत असणारे पदाधिकारीही निवडणूक आली की,आश्वासनाचा पाऊस पाडतात. निवडणूक झाली गायब होतात.ते दुसऱ्या निवडणूकीत दिसतात.कबाडकष्ठ करूनही हाल सुरू आहेत.आताही गेल्या चार दिवसात बिघडलेल्या वातावरणाचा फटका आम्हा शेतकऱ्यांना बसला आहे.आमच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने मदत द्यावी,असेही बोरामणी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.