रांजणी: रांजणी ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त संरपचपदी माधव कुलकर्णी यांची निवड झाली. त्यांचे बंन्धू विजयराव कुलकर्णी यांच्या अचानक निधनाने ही पोटनिवडणूक लागली होती. कुलकर्णी कुंटुबीयांची रांजणी गावात अनेक समाजउपयोगी कामे केली आहे. मंदिरे,रस्ते,असे अनेक सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्या पाश्वभूमीवर गतवेळी विजयराव कुलकर्णी पहिले लोकनियुक्त संरपच म्हणून निवड झाली होती. त्याचे अचानक निधन झाले.त्यांच्या निधनाने गावात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी माधव कुलकर्णी हे निवडणूकीत उभे राहिले होते.अत्यंत चुरशीने व प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणूकीत माधव कुलकर्णी यांनी 1865 मते मिळवून विजय खेचून आणला.तर विरोधी उमेदवार विकास भगवान भोसले यांना 1731 इतकी मते मिळाली.अत्यतं टोकाची ही निवडणूक झाली होती.





