कोसारी : कोसारीत साठवण तलावात म्हैसाळचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोसारी गावच्या शेतकऱ्यांच्या विशेष प्रयत्नामुळे कोसारी साठवण तलावात पाणी सोडण्यात आले. तलावाची पाण्याची पातळी कमी झाली असल्याने शेतकर्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.एकीकडे आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे कोसारी-शेगाव व कोसारी-कुंभारी रस्त्यावरील कालबाह्य पुलांचा प्रश्न बनला आहे. सध्या पुलावरूव पाणी वाहत असल्याने वाहतूक खोंळबत आहे.त्यामुळे प्रलंबित असनारे कोसारी-कुंभारी व कोसारी-शेगाव रस्त्यावरील पुलांचे काम तात्काळ पुर्ण करण्याची मागणी होत आहे





