कोट्यवधी पैसा वळविला , विद्यार्थी संतप्त
दि.१४ जुलै परिपत्रक काढून राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये जवळपास ६६ तीर्थस्थळ समाविष्ट आहेत. यातून प्रवास खर्च रुपये ३०,००० /- प्रति व्यक्ती इतकी देण्यात येणार आहे. या सोबतच ‘
स्वतंत्र बजेट कायदा व निधी न वळविण्याबाबत कायदाची मागणी:
कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्याप्रमाणे बजेट कायदा तसेच अनुसूचित जातीचा निधी इतरत्र न वळविण्याबाबत कायदा केलेला आहे, हा कायदा महाराष्ट्र सरकारने पारित करावा अशी मागणी देखील होत आहे. सामाजिक न्याय विभागाचा जवळपास २३ हजार कोटीहून अधिक निधी सन २०१० पासून इतरत्र वळविण्यात आलेला आहे. कडक कायद्याची मागणी.
शिष्यवृत्ती थकीत, विद्यार्थ्यांचे पावसात लॉंग मार्च:
अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती थकीत आहेत. प्रलंबित फेलोशिप करिता पीएचडी विद्यार्थी हे भर पावसात लॉंग मार्च काढत मुंबईत दाखल झाले आहेत. अत्याचारग्रस्त पीडितांना निधी नाही, हॉस्टेल दुरवस्था, अंतरजातीय योजनेला निधी नाही, परदेशी शिष्यवृत्ती थकीत आहे, स्कॉलरशिप मर्यादा वाढून ८ लाख करावी, स्वतंत्र बजेट कायदा करावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.