जत तालुक्यात दिवसभर संततधार
जत,प्रतिनिधी : मुंबई,कोकण भागात पडत असलेल्या पावसाचा प्रभाव जत तालुक्यातही गेल्या काही दिवसापासून जाणवत आहे.गेल्या आठवड्यापासून पावसाचे दररोज कमी-जास्त प्रमाणात आगमन झाले आहे.रवीवारीही जत तालुक्यात दिवसभर थांबून थांबून संततधार सुरू होती.
त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला.दुसरीकडे सततच्या पावसामुळे काही पिकांना फायदा तर कडधान्यांना फटका बसत आहेत.काढण्यासाठी आलेल्या कडधान्याची काढणी रखडली आहे.दिवसभरात पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत.दरम्यान सततच्या द्राक्ष बागांनाही या पावसाने विविध रोगाने पछाडले आहे.