पारधी हत्याकांड; गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा:बहुजन आघाडी जत शाखेची मागणी
जत,प्रतिनिधी : बीड येथे जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार जणांची हत्या करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी जत शाखेच्या वतीने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या हत्याकांडाची चौकशी करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली आहे.तसे निवेदन जत तहसीलदार यांना देण्यात आले.बाबू पवार, प्रकाश पवार त्याची पत्नी जादुई पवार आणि संजय पवार यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला,यांची नि:पक्ष चौकशी करून कारवाई करावी,अशी मागणी तालुकाध्यक्ष अमोल साबळे यांनी केली आहे.यावेळी तायाप्पा वाघमोडे,आकाश साबळे,विठ्ठल व्हंनकडे,राहुल काळे,रमेश कोळेकर,आकाश बनसोडे आदी उपस्थित होते.