नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा विहिर बनली यमदूत

0

जत,प्रतिनिधी: जत शहरातील राधिका सुभाष कोळी  वय-32 हिने घरगुती वादातून तीन मुलांसह यल्लम्मा देवी मदिंरा नजिकच्या नगरपालिकेच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.प्रज्वल वय-4 वर्ष,आराध्या  वय-3,यश वय-4 वर्ष अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहे.घरात रात्री झालेल्या भांडणामुळे निघून गेलेल्या राधिकाच्या यशचा मृत्तदेह विहिरीत तंरगताना दिसल्याने ही घटना समोर आली.शहरापासून सुमारे दोन किलोमीटर लांब हि विहिर आहे.नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा विहिर बनली यमदूत बनली आहे.तीन चिमुकल्यासह चार जीव गेले आहेत.
अगदी प्रसिध्द श्री.यल्लम्मा देवीच्या मंदिराला लागून असणाऱ्या या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विहिरीला वरून जाळी टाकून बंद करणे गरजेचे होते.मात्र जाळी नसल्याने या तीन निष्पापांना जीव गमवावा लागला आहे.विशेष म्हणजे जत शहराला पाणी पुरवठा या विहिरीतून होतोयं.
विहिरीवर जाळी असतीतर हा प्रकार झाला नसता असा काहीसा सुरू उपस्थितामधून व्यक्त होत होता.
ग्रामपंचायत असल्यापासून जत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी येथे विहिरी खोदण्यात आली आहे.यल्लम्मा मंदिलाला लागून ओढापात्रात ही विहिरी आहे.बाजूने कठडा आहे.मात्र सुमारे 50 फुट खोल असलेल्या विहिरीवर जाळी नाही.त्यामुळे धोकादायक विहिरी होती.या परिसरात कायम भाविकांची गर्दी असते.त्यामुळे करोडो रुपये खर्च करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला या विहिरीवर जाळी टाकता आली नाही.त्यामुळे असा प्रकार उद्भवला आहे.आतातरी प्रशासनाने बोध घेऊन विहिरीचे वरील भाग जाळी टाकून बंद करावा अशी मागणी होत आहे.

Rate Card

नगरपालिकेची यमदूत ठरलेली विहिर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.