जतला आदर्श बनविणसाठी राष्ट्रवादीची सर्व ताकद लावू: जयंतराव पाटील सोनेरी टोळीने जतला लुटले: नगर पालिका राष्ट्रवादी प्रचार सभेत सुरेश शिंदे तोफ डागली
जत: राष्ट्रवादीच प्रचार सभेत बोलताना आमदार जंत पाटील, शेजारी नेते सुरेश शिंदे, रमेश पाटील आदी.
जत,प्रतिनिधी :
जत शहराला राजतील एक आदर्श शहर बनविणसाठी राष्ट्रवादीची सर्व ताकद आपल्या पाठीमागे उभी करू. शहराच विकासाचा अतिशय आदर्श जाहीरनामा सुरेश शिंदे यांनी मांडला आहे. जिथे जिथे राष्ट्रवादीची सत्ता आली. ती सर्व शहरे आदर्श झाली आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री जंयत पाटील यांनी प्रचार सभेत केले.
ग्रामदेैवत चिनगीसाहेब यांच्या मंदीरात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ माजी मंत्री, आमदार जंत पाटील यांनी फोडला. शहरातून पदात्रा काढण्यात आली.
त़्यानं तर पेठेतील मारूती मंदीरासमोर प्रचारसभा घेणत आली. सभेस राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, माजी सभापती मन्सूर खतीब, रमेश पाटील, तालुका अध्क्ष अॅण्ड. बसवराज धोडमनी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शबाना इनामदार, जि.प.च्या माजी सभापती जोत्स्नाताई पवार, बंदेनवाज पटाईत, रशीद पटाईत, प्राचार्य सुभाष बिराजदार, डॉ. पराग पवार, प्रा. हेमत चौगुले, मच्छिंद्र वाघमोडे, दलित महासंघाचे प्रकाश देवकुळे, जे. के. माळी, युवक आघाडीचे अध्यक्ष उत्तम चव्हाण, बाजी केंगार, आप्पा पवार, टीमू एडके आदी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, .भाजप म्हणजे निवडणूकीचे यंत्र आहे. केवळ घोषणाबाजी करून त्यांना निवडणूका लढविता येतात. सकाळी दिलेली आश्वासने सांयकाळी ते विसरतात. आज शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला,वीजप्रकल्पाच्या कोळसा खरेदीला त्याच्याकडे पैसा नाही. जनतेसाठी तिजोरी मोकळी करण्याची अनेक खोटी आश्वासने देवेंद्रफडणवीस यांनी दिली असलची टीका तंनी केली.
माणसाचा जन्म एकदाच असतो. आपण ज्या शहरात राहतो, त्या ठिकाणी सुविधा मिळविणे हा आपला मुलभूत ह्नक आहे. आज जत नगर पालिका बालावस्थेत आहे. याच काळात नागरिकांनी अधिक दक्ष राहणची गरज आहे.तरच पुढील पिढीला अधिक चांगल सुविधा मिळू शकतील. शहराचा अधिक चांगल पध्दतीने विकास होऊ शकेल.
यावेळी सुरेश शिंदे यांनी जोरदार तोफ डागली.ते म्हणाले, जत शहराला लूटणार सोनेरी टोळीला जनतेने धडा शिकविणची गरज आहे.ल्लमादेवीची यात्रेची आरक्षित जागा विकली,नाहरकत, गुंठेवारीसाठी जनतेचे खिसे कापण्याचे उद्योग केले. एकीकडे विकास योजनाची शहरातील रस्त्याची वाट लावली तर दुसरीकडे जनतेची लूट केेली. म्हणून त्यांना आम्ही हाकलून दिले. आज त्यांना घेऊन काँग्रेसने पॅनेल केले आहे. ज्यांचे जत शहरातमतदानही नाही, ते आज काँग्रेसचे नेतृत्व करायला निघाले आहेत. टोळीचे प्रमुख बनले आहेत.माझ्या वर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे कुटुंब समाजाने वाळीत टाकले होते. मी त्याला वीस वर्षे सत्तेत राहणची संधी दिली. प्रत्येकवेळी सत्तेत रहायचे व स्वत:ची घरे नगर पालिकेवर चालवाची. असा त्यांचा उद्योग आहे. थिएटरमध्ये डोअरकिपर म्हणून काम करणाऱ्या एकाला सरपंच केले. आज शहराला लूटणार टोळीत तोही सहभागी झाला आहे.
बिरनाळ तलावात पाणी असतानाही आज शहरास पाणी मिळत नाही. शहरात एकही चांगला रस्ता नाही. खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा अशी वाईट अवस्था आहे. गटारी,उद्यानांची दुरवस्था झाली आहे. पुतळ्यांची कामे रखडली आहेत. ज्यांनी भष्ट्र मार्गाने केवळ सत्ता टिकविणचा प्रयत्न केला. त्यांना बाजूला करा, नाहीतर नगरपालिकाही ते विकतील, अशी टीका शिंदे यांनी केली. आम्ही सर्वसामान्यातील उच्चशिक्षीत लोकांना उमेदवारी दिली आहे.या शहराला एक नवा चेहरा देण़्याचे काम आम्ही पुढील काळात करणार आहोत.
मन्सूर खतीब म्हणाले, ज्यांच्या कडे कोणतीच सत्ता नव्हती, अशा आपल्या पाहुण्याला आमदार करण़्याच्या इच्छेसाठी तालुक्यातील काँग्रेस जिल्ह्यातील नेत्यांनी संपविली.जत शहराला कुटूंब माननाऱ्या सुरेश शिंदे यांच्या पाठीशी जत शहरातील जनतेनी खंबीरपणे उभे रहावे.