नाटक : तोच परत आलाय

0

नाटक तोच परत आलाय 



एखादा प्रसंग अंगावर अचानक आला कि मनाची घालमेल होतेआणि नेमके काय करावे हे सुचत नाहीजी घटना घडली आहे त्याच्या मागेपुढे काय घडले ह्याचा तपास सुरु होतो आणि तपास सुरु झाला कि रहस्य वाढत जाते आणि रहस्य वाढायला लागले कि गुंतागुंत सुरु होते हे कोणामुळे झालं तर कोणीतरी परत आलाय आणि म्हणून हे सारे घडते,, हाच धागा पकडून ” तोच परत आलाय ” हे नाटक गणरंग आणि महाराष्ट्र रंगभूमी या नाटय संस्थेने सादर केलं आहेलेखन प्रवीण धोपट यांचे आहेनाटकाची निर्मिती वैजयंती आपटे यांची असून दिगदर्शन मंगेश सातपुते यांचे लाभले आहेनेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केलं असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांनी आहेअशोक पत्की यांनी दिलेलं संगीत हे परिणाम साधून जातेया नाटकात संग्राम समेळगिरीश परदेशीशृजा प्रभुदेसाईरमेश रोकडेसुनील खंडागळेसमता जाधवकळंबे,चंद्रकांत पांचाळसमीर पाठारे या कलाकारांच्या भूमिका आहेत.

डॉ आनंद परांजपे एक प्रतिष्ठित डॉक्टरत्यांच्या हाताला यश आहेआणि त्यांचा डॉक्टरकी चा व्यवसाय खूप जोरात सुरु आहेआपण मिळवलेल्या पैश्यातून एक मोठं हॉस्पिटल बांधले जावे अशी त्यांची इच्छा असून त्या दिशेनं त्यांची पाऊले पडत आहेतत्यांची पत्नी मानसी ह्या सुविद्ध असून त्यांना रोहन नावाचा एक मुलगा आहेतो क्लास ला गेलेला असून अजून परत आलेला नाही त्यामुळे मानसीला काळजी लागून राहिलेली असतेत्याचवेळी फोन वाजतो ती फोन उचलते पण पलीकडून कोणीच बोलत नाहीत्यामुळे काळजी वाढत जातेडॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम केल्यामुळे पुरस्कार मिळालेला असतो,त्याच प्रमाणे ते हॉस्पिटलच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला निघालेले असतानाच एक व्यक्ती घरात शिरते आणि कि माझी एक वस्तू आपणाकडे आहे ती वस्तू मला परत द्या किंवा पांच लाख रुपये द्यात्या व्यक्ती चे नांव असते रोहिदास सदाशिव भोसलेडॉक्टर आणि रोहिदास चे संभाषण सुरु असताना मानसी तेथे येते त्यावेळी रोहिदास डॉक्टरांना विचारतो कि रोहन आपलाच मुलगा आहे का मानसीला पुन्हा धक्का बसतोत्याचवेळी फोन वाजतोतो फोन डॉ मेहता यांचा असतो डॉ आनंद परांजपे त्यांच्याशी बोलतात पण मानसीच्या मनातून चिंता काही जात नाही.

कालांतराने तोच रोहिदास पुन्हा परत डॉक्टरांच्या कडे येतो आणि काही गोष्टींचा खुलासा करीत दहा लाखाची मागणी करतोडॉक्टर सारे अमान्य करतातत्याचवेळी तिथे विठ्ठल सोनावणे आणि सुशीला सोनावणे येतात आणि ते सुद्धा रोहन माझा मुलगा आहे असे सांगून तो मुलगा परत हवा आहे असे सांगतातमानसीच्या समोर सारे घडतेरोहन सुद्धा घरी आलेला नसतोत्याला कोणी पळवून नेला आहे असे वाटून पोलीस तपास सुरु होतोमानसीला प्रश्न पडलेला आहे कि आपला मुलगा रोहन ह्याला हि मंडळी का मागतात विठ्ठल सोनावणे आणि सुशीला सोनावणे यांचा ह्या मुलाशी काय संबंध रोहिदास सदाशिव भोसले सातत्याने डॉ आनंद परांजपे याना कश्यासाठी भेटत असतो अश्या अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे ह्या नाटकात मिळतील ?

डॉ आनंद परांजपे ची भूमिका गिरीश परदेशी यांनी साकारली असून त्याने डॉक्टरीपेशा मधील बारकावे अत्यंत संयमाने साकारले आहेतमानसी परांजपे ची भूमिका शृजा प्रभुदेसाई यांनी विलक्षण ताकदीनं रंगवली आहेसुखदुःखाच्या छटा त्यांनी रंगविल्या आहेतरोहिदास सदाशिव भोसले ची व्यक्तिरेखा संग्राम समेळ यांनी आत्मविश्वासाने त्यातील बारीकसारीक बारकाव्यांसह पेश केली आहेयाशिवाय सुनील खंडागळेरमेश रोकडेसमता जाधवकळंबेचंद्रकांत पांचाळसमीर पाठारेयांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.

Rate Card

आजकालच्या डॉक्टरी पेशा मध्ये आयव्हीएफ हे वैद्यकीय तंत्र विकसीत झाले असून त्याचे फायदे आहेत पण त्याचा गैरफायदा – गैरवापर केला जातो ह्यावर भाष्य करणारे हे नाटक आहेनाटकात एक मुलगा आणि त्याच्यावर हक्क सांगणारे तिघेजण हि एक विलक्षण गुंतागुंत असून त्या मधील रहस्याची उकल ह्या नाटकात केली आहेउत्कंठा वाढवून परिणाम साधणारे हे नाटक आहे.


दीनानाथ घारपुरे मनोरंजन प्रतिनिधी ९९३०११२९९७


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.