भाजपच तालुक्यात नंबर 1 पक्ष 36 ग्रामपंचायतीत आमची सत्ता ; आ. विलासराव जगताप

0

भाजपच तालुक्यात नंबर 1 पक्ष 

कॉग्रेसची आकडेवारी बोगस : 36 ग्रामपंचायतीत आमची सत्ता ; आ. विलासराव जगताप

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत 36 गावात भाजपचे संरपच निवडून आले आहेत. कॉग्रेसने दिलेले आकडेवारी चुकीची आहे. त्यांनी ती सिध्द करून दाखवावी,नाहीतर राजिनामे द्यावेत असा इशारा आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिला.

Rate Card

आमदार  जगताप म्हणाले, भाजपच्या विकास कामाला जत तालुक्यातील मतदारांनी स्विकारले आहे.त्यामुळे जत तालुक्यात सर्वाधिंक ठिकाणी भाजपला यश मिळाले आहे. तालुक्यातील मोठी गावे डफळापूर, बाज,संख,जाड्डरबोबलाद, सोन्याळमध्ये भाजपचे उमेदवांरानी सत्तांतर केले आहे. भाजप सरकारच्या विकास धोरणामुळे तालुकाभर भाजपचे मोठ्या प्रमाणात संरपच व सदस्य पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

जगताप म्हणाले, कॉग्रेस कडून आमचे सर्वाधिंक ग्रामपंचायतीत सत्ता आल्याचे सांगितले आहे. पंरतू ते बोगस आहे. त्यांनी आलेल्या ग्रामपंचायती सिध्द करून दाखवाव्यात अन्यथा आम्ही सिध्द करून दाखवितो असेही जगताप यांनी सांगितले. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यानी संखमध्ये पंचवीस वर्षापासून सत्तेत असलेल्या बसवराज पाटील,जाड्डरबोबलाद मधील ग्रामपंचायतीत सभापती तम्माणगौंडा रवी यांनी संत्तातर घडविले आहे.डफळापूर मध्ये दिग्विजय चव्हाण यांची सत्ता काढून घेतली आहे. बाजमध्ये कॉग्रेसच्या आकाराम मासाळ यांचे संस्थान खालसा केले आहे. सोन्याळ मध्ये सभापती पाटील यांची सत्ता रोकली आहे.त्यामुळे भाजपच नंबर एकचा पक्ष बनला आहे. असेही आ. जगताप यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.