जत,संकेत टाइम्स : जत तालुका आरपीआय आठवले गट यांच्या वतीने जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना, जत साखर कारखान्यासह अनेक मागण्यासाठी संख येथील बाबा मंगल कार्यालयात बुधवार ता.१३ रोजी होत असलेल्या शेतकरी मेळाव्यास तालुक्यातील शेतकरी,नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केले आहे.
