या अगोदर ऑगस्ट – सप्टेंबर २०२१ मध्ये २.५० टीएमसी कृष्णा नदीच्या पुराचे पाणी उचलून योजनेच्या लाभ क्षेत्रातील तालुक्यातील सर्व तलाव भरून देण्यात आले होते. त्याचा
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.
सन २०२१-२२ चे उन्हाळी आवर्तन सुरु करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून
पाणी मागणी अर्ज जमा करण्याबाबत
वृत्तपत्रांमध्ये जानेवारी महिन्यात जाहीर प्रकटन देण्यात आले होते. तसेच गावोगावी अभियान राबविण्यात आले होते. यास अनुसरून सन २०२१-२२ उन्हाळी आवर्तन आज दिनांक ३ मार्च २०२२ पासून सुरू करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत
याचा लाभ क्षेत्रातील सर्व ६ तालुक्यातील गावांना होणार आहे.