सध्याची वाढती वीज मागणी व अपुरा पुरवठा यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.वाढत्या तापमानवाढीत भारनियमन टाळून वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा महावितरणचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. वीज चोरांवर कारवाई ही त्याचा एक भाग आहे. वाढत्या वीज चोरीमुळे विजेची हानी वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो. वीज पुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो.
महावितरणने आकडेबहादरांविरूध्द कडक मोहिम राबविण्यास प्रारंभ केला आहे. कवठेमहांकाळ व तासगाव येथे कार्यकारी अभियंता श्री. संदिप सानफ व कार्यकारी अभियंता श्री. सौरभ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.