जत,संकेत टाइम्स : पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेरणी कालावधीही निघुन जात असल्याने यंदाच्या पेरण्याही यशस्वी होतील की नाही? या विवंचनेत बळीराजा आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावुन पावसाची वाट पाहत आहे.
ऊसणवारीच्या पैशातून खत, बि– बियाणे
पदरमोड करुन, ऊसणवारी करुन खत, बि-बियाणे शेतकऱ्यांनी आणून ठेवले आहेत.काही शेतकऱ्यांनी गत पंधरवड्यात पडलेल्या पावसावर केलेल्या पेरण्यालाही आता फक्त प्रतीक्षा फक्त पावसाची आहे. यावर्षी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास खरा ठरत आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्याला सुरुवात केली आहे. मात्र जत तालुक्यातील अनेक गावामध्ये अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत.