लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा हुंकार
या महोत्सवासाठी पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, बाबा सिचेवाल, संजयसिंह सज्जन, ५८ गावातील दुष्काळ हटविणारे लक्ष्मण सिंह, पर्यटनवाढीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कानसिंह निर्वाण, शंभर एकरमध्ये सेंद्रिय शेती करणारे किसनसिंह जाखड, देशातील सुप्रसिद्ध उद्योजक श्रीधर व्यंभू, हणमंतराव गायकवाड, पोपटराव पवार, विजय संकेश्वर, मिलेटमॅन डॉ. कादर, स्वामी त्याग वल्लभ दासी, माधवप्रिय दासजी, केंद्रिय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मंत्री अनुराग ठाकूर, संशोधक गुरूराज करजगी, खासदार अमोल कोल्हे, तेजस्वी सूर्या, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांचे अनुभव येथे ऐकायला मिळणार आहेत.
याबाबत श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे विश्वस्त उदय सामंत यांनी सांगितले की, देशात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अतिशय दिग्गज या लोकोत्सवात सहभागी होणार असल्याने त्याचा मोठा फायदा स्थानिक आणि सहभागी लोकांना होणार आहे.
अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शेती, अर्थकारण यासह सर्व क्षेत्रातील रोल मॉडेल, मान्यवर आणि दिग्गज व्यक्ती या लोकोत्सवात सहभागी होणार आहेत, त्यांच्या अनुभवाचा, संघर्षमय आणि प्रेरणादायी वाटचालीची माहिती मिळणार आहे, यामुळे हा लोकोत्सव नव्या पिढीला निश्चितपणे आशेची नवी किरणे देईल.
संतोष पाटील, विश्वस्त श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ
७ दिवस रंगणार लोकोत्सव
२८ राज्यांचा असणार समावेश
५० देशांतून येणार परदेशी पाहुणे
३०० जिल्ह्यातील संस्था, प्रतिनिधींचा सहभाग
५०० कुलगुरूंची राहणार उपस्थिती
६५० एकरात लोकोत्सव
१००० देशभरातील साधूसंतांचा लाभणार सहवास
४००० वैंदूंचे होणार संमेलन
१०,००० व्यवसायिकांचे संमेलन आणि अनुभव कथन
तीस लाख लोकांचा सहभाग अपेक्षित
एक लाख स्व्केअर फुट जागेत मुख्य मंडप
