महावितरणची शेतकऱ्यांसाठी झटपट वीज कनेक्शन योजना,वाचा एका क्लिकवर सविस्तर
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)
![](http://sankettimes.com/wp-content/uploads/2023/07/Sanket_SANKET_MAI_20230713_1_12_-300x199.jpeg)
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नव्या वीज कनेक्शनसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. याचा भाग म्हणून महावितरणने जून महिन्यात दहा दिवसात एक लाख नवीन घरगुती वीज कनेक्शन दिली.आता नव्या कनेक्शनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज कनेक्शन देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे. महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम चालू आहे.
![](http://sankettimes.com/wp-content/uploads/2023/07/Sanket_SANKET_MAI_20230729_3_1_-300x180.jpeg)
![](http://sankettimes.com/wp-content/uploads/2023/07/Sanket_SANKET_MAI_20230729_1_14_-277x300.jpeg)
![](http://sankettimes.com/wp-content/uploads/2023/07/Sanket_SANKET_MAI_20230729_1_14_-277x300.jpeg)
कृषी ग्राहकांना वीज कनेक्शन देणे हे तुलनेने अवघड असते. शेतामध्ये दूरवर असलेल्या विहिरीवरील कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचा खांब, वायर, ट्रान्सफॉर्मर अशा पायाभूत सुविधा अनेकदा उभाराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जोडणी मिळण्यास विलंब लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणने गेल्या वर्षभरात मोहीम राबविली. त्यातून निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी कनेक्शन देण्याचाही वेग वाढला आहे. जुलै महिन्यात राज्यात १२२७ शेतकऱ्यांना झटपट वीज कनेक्शन मिळाली. त्यापैकी ७४ शेतकऱ्यांना अर्ज केल्याच्या दिवशीच तर ४९३ शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर २४ तासात वीज कनेक्शन मिळाले. अर्ज केल्यानंतर ४८ तासात कनेक्शन मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ११७ आहे तर ५४३ शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर ४८ तासात कनेक्शन मिळाले.