कोल्हापूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात जयसिंगपूरमधिल एकाच घरातील तीन जण ठार झाल्याची भिषण घटना शनिवारी सकाळी सात वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.

या अपघातात एकाच कुंटुबातील निखिल श्रीकांत सवाखंडे (वय 30),प्रियांका निखिल सवाखंडे (32),शशिकांत यदुनाथ सव्वाखंडे (63, सर्वजण रा.जयसिंगपूर,ता.शिरोळ, जिल्हा कोल्हापूर) हे ठार झाले आहेत.तर अन्य जखमींवर सातारा जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण तवेरा गाडीतूननवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे निघाले होते.
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूमजवळ अचानक तवेरा गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला तवेराची पाठीमागून जोरदार धडक बसली. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.गाडीतील आणखीन काही जखमीं झाले आहेत.त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघातात तवेरा गाडीचा चक्काचूर झाला आहे.सातारा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.महामार्गावरील घटनास्थळावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत.अद्याप पोलीसात अपघाताची अद्याप नोंद झालेली नाही.