सायंकाळी सहानंतर घराचे दरवाजे बंद | डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष

0
11
जत : जत तालुक्यातील अनेक गावात मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैरान असून, सहा वाजतानंतर डास घरात येऊ नय म्हणून गृहिणींना घराचा तर व्यावसायिकांना दुकानाचा दरवाजा बंद करावा लागत असल्याने ही समस्या किती गंभीर झाली याचा प्रत्यय येतो.अशा ग्रामपंचायत प्रशासनातर्फे डास निर्मूलन फवारणी करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून रोष करत आहेत. गेले सहा महिन्यांपासून डासांचे प्रमाण वाढले आहे.अस्वच्छ परिसर डबके, सांडपाण्याच्या नाला तुबल्याने डासांची उत्पत्ती झपाट्याने होत आहे.

सकाळी किंवा दुपारी डासांचे प्रमाण कमी असते; पण जशी संध्याकाळी सहा वाजले की डास घरे व दुकानात प्रवेश करतात.त्यामुळे गृहिणी घरे व व्यावसायिक दुकान काही वेळेसाठी बंद करुन डास प्रतिबंधक साधनाचा वापर करावा लागतो डास चावल्याने डेंगी, चिकणगुन्या, सामान्य ताप, अंगावर पुरळ येत खाज सुटणे, मलेरीया टायफाईड यासारखे अंगदुखी यासारखी लक्षणे दिसून येत आहेत.याबाबत ग्रामपंचायत प्रशासन ठिम्म असून डास निर्मूलन करण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलतांना दिसून येत नाही.

सायंकाळी सहा वाजतानंतर गावात सर्वत्र डासांचे प्रमाण फार वाढते. त्यामुळे घर दुकानात डास प्रतिबंधक कॉईल, लिक्वीड यासह इलेक्ट्रॉनिक बॅटचा आधार घ्यावा लागतो डास चावल्याने लहानबालक यासह अबालवृध्द आणि नागरिकांना साथीच्या रोगांना तोड द्यावे लागते डास माशा निर्मुलनासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here