जत : जत तालुक्यातील अनेक गावात मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैरान असून, सहा वाजतानंतर डास घरात येऊ नय म्हणून गृहिणींना घराचा तर व्यावसायिकांना दुकानाचा दरवाजा बंद करावा लागत असल्याने ही समस्या किती गंभीर झाली याचा प्रत्यय येतो.अशा ग्रामपंचायत प्रशासनातर्फे डास निर्मूलन फवारणी करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून रोष करत आहेत. गेले सहा महिन्यांपासून डासांचे प्रमाण वाढले आहे.अस्वच्छ परिसर डबके, सांडपाण्याच्या नाला तुबल्याने डासांची उत्पत्ती झपाट्याने होत आहे.
सकाळी किंवा दुपारी डासांचे प्रमाण कमी असते; पण जशी संध्याकाळी सहा वाजले की डास घरे व दुकानात प्रवेश करतात.त्यामुळे गृहिणी घरे व व्यावसायिक दुकान काही वेळेसाठी बंद करुन डास प्रतिबंधक साधनाचा वापर करावा लागतो डास चावल्याने डेंगी, चिकणगुन्या, सामान्य ताप, अंगावर पुरळ येत खाज सुटणे, मलेरीया टायफाईड यासारखे अंगदुखी यासारखी लक्षणे दिसून येत आहेत.याबाबत ग्रामपंचायत प्रशासन ठिम्म असून डास निर्मूलन करण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलतांना दिसून येत नाही.