काश्मीर आमचा अविभाज्य भाग | खा.ओवैसींनी पाकिस्तानला ठणकावलं

0
11

परभणी : काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे.पाकिस्तानची आर्थिक कोंडी करा. पाकिस्तानवर अशी कारवाई करा की पुन्हा एकाही भारतीयाचा जीव घेतला नाही पाहिजे.  तुम्ही आम्हाला धमक्या देऊ शकत नाहीत, काश्मीर आमचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला चांगलच ठणकावलं आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी   हल्ल्याचा खासदार ओवैसींनी तीव्र निषेध केलाय. दरम्यान, वक्फ बिलात झालेल्या बदलावरूनही ते बोललेत. आमच्या धार्मिक स्थळांच्या जमिनी घेण्याचे हे षडयंत्र आहे. हा काळा कायदा आहे. आम्ही याला फाडतो. असेही ओवैसी म्हणालेत. परभणीत वक्फ कायद्यातील बदलाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात ते बोलत होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here