शेतकऱ्याला समृद्ध करण्यावर सरकारचा भर : पंतप्रधान मोदी

0



नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात पंतप्रधानांनी जमा केला. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते.





Rate Card



यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना संबोधित केले.पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यावर सरकारचा भर आहे.सरकारने नव्या धोरणाने काम सुरु केले. शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जगामध्ये काय नवे घडतेय,त्याची माहिती सखोल अभ्यास करून त्या दृष्टीने काम सरकारकडून करण्यात येत आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.